तामिळनाडू: जिल्हा प्रशासनाने उस थकबाकीबाबत कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून केली मार्गदर्शनाची मागणी

मदुरई: तेनकासी जिल्ह्यामध्ये स्थित धरानी साखर कारखाना शेतकर्‍यांचे पैसे भागवण्यात अपयशी राहिला. उस थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे जिल्हा प्रशासनाने तामिळनाडू सरकाला कारखान्याच्या विरोधात कारवाईसाठी आदेशाची मागणी केली आहे.

शेतकर्‍यांचा दावा आहे की, वासुदेव वनल्लुर स्थित धरानी शुकर्स ने 2018-2019 हंगामा दरम्यान शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या उसाचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. हे पैसे 30 ऑक्टोबर करणे आवश्यक होते, आतापर्यंत र्पैसे भागवलेले नाहीत. उस शेतकर्‍यांनी शुक्रवारी आयोजित तक्रार दिवसाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. जिल्हाधिकारी जी एस समीरन यांनी पीडित शेतकर्‍यांना सूचित केले की, जिल्हा प्रशासनाने या संबंधामध्ये कृषी सचिवांना पत्र लिहून उर्वरीत थकबाकी लवकरात लवकर भागवण्यासाठी कारवाई केल्याबाबत मार्गदर्शनाची मागणी केली आहे. धरनी शुगर्स व्यवस्थापनालाही पत्र पाठवण्यात आले आहे. सरकारकडून मिळणार्‍या मार्गदर्शनाच्या आधारावर लवकरच योग्य कारवाई केली जाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here