भारताच्या तांदूळ निर्यात बंदीचा थायलंडला होतोय फायदा

बँकॉक : भारताच्या तांदूळ निर्यात बंदीचा सर्वात जास्त फायदा थायलंडला होत आहे आणि त्यांच्याकडे तांदूळ निर्यात बंदी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे वाणिज्य मंत्री ज्युरिन लक्सानाविसिट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री ज्युरिन लक्सानाविसिट म्हणाले, थाई सरकार देशांतर्गत वापर आणि निर्यात दोन्हीसाठी पुरेसे तांदूळ उत्पादन सुनिश्चित करेल. तांदळाच्या देशांतर्गत किंमत खूप जास्त नसल्याचा दावाही त्यांनी केला.

पहिल्या सात महिन्यांत थायलंडने 4.8 दशलक्ष मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली, तर मासिक निर्यात 700,000 ते 800,000 मेट्रिक टन केली जात आहे. थायलंड हा भारतानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे आणि या वर्षी 8 दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक तांदूळ निर्यात करण्याची अपेक्षा आहे. बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here