बँकॉक : जास्त पाऊस पडल्यामुळे थायलंडमधील २०२४-२५ या पीक वर्षात, उसाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु ऊस जाळून तोडणी करण्याच्या विषयावर शेतकऱ्यांना कडक तपासणीला सामोरे जावे लागेल, असा इशारा ऊस आणि साखर मंडळाच्या (OCSB) कार्यालयाने दिला आहे. सरकारने जळत्या उसाचे उत्सर्जन रोखण्यासाठी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जळलेला ऊस खरेदी केल्याबाबत, उदोन थानी येथील एका साखर कारखाना तात्पुरता बंद करण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिले होते. जळत्या ऊसामुळे पीएम२.५ अतिसूक्ष्म धूळ उत्सर्जित होते, त्यामुळे कारखान्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
थायलंडमध्ये २०२४-२५ पीक वर्षात, उसाचे प्रमाण ९० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ११ दशलक्ष टन साखर उत्पादन होईल, असे ओसीएसबीचे उपमहासचिव समार्ट नोइरुन यांनी सांगितले. दुष्काळामुळे २०२३-२४ च्या पीक वर्षात उसाचे उत्पादन ८३ दशलक्ष टन झाले. या पीक काळात सुमारे ९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले.
अधिक पावसामुळे माती ओलसर आहे आणि त्यात पुरेसे पोषक घटक आहेत, जे शेतीसाठी योग्य आहेत, असे समार्ट म्हणाले. ओसीएसबीच्या मते, २२ जानेवारीपर्यंत जागतिक साखरेचा भाव १७ सेंट प्रति पौंड होता, जो २०२२ मध्ये २२ सेंटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कमी किमतींमुळे साखर उत्पादकांचे उत्पादन कमी करण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून होणाऱ्या रिफाइंड साखरेच्या पुरवठ्यात वाढल्याने जागतिक साखरेच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने गाळपासाठी ऊस गाळपास सुरुवात केला आहे. तर ऑस्ट्रेलिया लवकरच त्यांचा गाळप हंगाम सुरू करेल अशी अपेक्षा आहे.
थाई साखर कारखाने गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाचे गाळप करत आहेत. दरम्यान, राज्य सरकार पीक जळाले आहे की, नवीन ऊस आहे याची तपासणी करत आहे. ऊस तोडणीसाठी खूप श्रम लागतात, म्हणूनच बरेच शेतकरी ऊस जाळतात. हिवाळ्यात ऊस जाळल्याने हवेची गुणवत्ता बिघडते, ज्यामुळे PM२.५ ची पातळी वाढते. ऊस जाळण्यामुळे होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाबद्दल जागतिक चिंतेमुळे थाई साखर निर्यातीवर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आणि PM२.५ पातळी कमी करण्यासाठी उद्योग मंत्रालय ऊस जाळण्याचे प्रमाण कमी करू इच्छित आहे.
समार्ट म्हणाले की, ओसीएसबी साखर उत्पादकांना जळलेला ऊस खरेदी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर कार्बन कर लादण्याच्या योजनेचा अभ्यास करत आहे. हे उपाय हवामान बदल विधेयकाशी सुसंगत आहे, जे यावर्षी लागू केले जाणार आहे. सुमारे ७० लाख टन ऊस किंवा एकूण उत्पादनाच्या १७.८ टक्के जाळून काढला जातो. इतर प्रांतांपेक्षा उदोन थानी आणि खोन केनमध्ये ही पद्धत अधिक प्रमाणात वापरली जाते असे मानले जाते.