महाराष्ट्रात आणखी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार

महाराष्ट्रीत अनेक ठिकाणी आजही थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहील अशी शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थंडी वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये थंडी कायम राहील. तर आगामी काही दिवसांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

एबीपी लाईव्ह डॉट कॉमवरील वृत्तानुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी ओसरू लागेल. मुंबई हवामान विभागाने सांगितले की, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही राज्याच्या काही भागात पाऊस होईल. मुंबईत किमान तापमान ३३ तर कमाल तापमान १८ डिग्री नोंदवण्यात आले आहे. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी प्रदूषणाचा स्तर चिंताजनक आहे. अशाच या आठवड्यातील पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान ३१ तर किमान तापमान १४ डिग्री आहे. चार फेब्रुवारीपर्यंत दाट धुके राहील. नागपूरमध्ये आठवडाभर हवामान साफ राहील.

तर नाशिकमध्ये उद्या ढगाळ हवामानाची शक्यता आहे. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here