शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी

रोहटा : विभागातील पंचायत सदस्य आणि सरपंचांच्या बैठकीत गावच्या विकासाबाबतच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी रेखा रानी विभागातील विविध गावांतील सदस्य आणि सरपंचांनी आलेल्या प्रस्तावांवर तसेच समस्यांविषयी चर्चा केली. सरपंचांनी थकीत ऊस बिलाचा मुद्दा उपस्थित केला. किनौनी आणि सिंभावली साखर कारखान्याकडील थकबाकी अधिक असून ही बिले त्वरीत देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गट विकास अधिकारी दीपक तेवतीया यांनी पंचायतींमध्ये सचिवांच्या कमतरतेच्या मुद्यावर लवकरच विचार केला जाईल असे सांगितले. गोशालांमध्ये सर्वांनी सहकार्य करावे अशी सूचना करण्यात आली. जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिले दिली गेली नाहीत, तर पंचायत बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असा इशारा मलियाना ऊस समितीचे चेअरमन विजेंद्र प्रमुख यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी रिंकू कुमार, एडीओ विश्वेंद्र सिंह, बाबूराम आर्य, गट विकास अधिकारी दीपक तेवतिया, धर्मेंद्र सांगवान, नजाकत अली, अशोक कल्याणपुर, वीरपाल डालमपूर, अरविंद प्रधान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here