उदगिरी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविणार: डॉ. राहुल कदम

सांगली : खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी दिली. ते म्हणाले, २०२३ – २०२४ हंगामात सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. माजी आमदार मोहनराव कदम, कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. राहुल कदम यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.

डॉ. कदम म्हणाले, आगामी हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी ऊस नोंदणी तसेच तोडणी – वाहतूक करार करण्यात येत आहेत. ऊस नोंदणीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कारखान्याची गाळप क्षमता दैनदिन पाच हजार टन आणि इथेनॉल उत्पादन क्षमता १ लाख ७५ हजार लिटर्स करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here