मुंबई : महाराष्ट्रात सध्या संमिश्र हवामान आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी अवकाश आहे. तर काही भाग उकाड्याने हैराण झाला आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागात हवामान साफ राहिल. उत्तर- मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरू शकते.
भारतीय हवामान विभागाने ७ ते ९ मे यादरम्यान नागपूरसह काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल. दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतेक शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.
एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, शनिवारी मुंबईत कमाल ३६ तर किमान २६ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ४० तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. नागपूरमध्ये तापमान ४४ आणि २७ असे राहिल. तर येथे काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिक, औरंगाबाद येथेही अशीच स्थिती राहील.