युपी: सीमावर्ती गावे साखर कारखान्याशी जोडण्याची मागणी

रुद्रपूर : उत्तर प्रदेशआत सीमावर्ती क्षेत्रालगतच्या गावांतील शेतकऱ्यांना सितारगंजच्या साखर कारखान्याशी जोडण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी कारखान्यात इथेनॉल प्लांट उभारण्याची मागणीही केली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रविवारी सरकडा पोलिस चौकीला लागून असलेल्या घेरा बिलाईहारा गावातील रहिवासी आणि समितीचे अध्यक्ष जगीर सिंह यांनी सांगितले की, सितारगंजची साखर कारखान्याची स्थापना उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असताना झाली होती. मात्र उत्तराखंडच्या निर्मितीनंतर येथील अनेक गावे साखर कारखान्याशी जोडली गेली. मात्र काही काळानंतर ही गावे कारखान्यातून काढून टाकण्यात आली. त्यामुळे हे शेतकरी आपला ऊस बेहेडी आणि पिलीभीत साखर कारखान्यांना पाठवत आहेत. त्यांनी उत्तराखंडचे ऊस आणि साखर उद्योग मंत्री सौरभ बहुगुणा आणि उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री संजय गंगवार यांच्याकडे शेतकऱ्यांना सितारागंज कारखान्याशी जोडण्याची मागणी केली. साखर कारखान्यात यंदा कमी तांत्रिक बिघाड झाले. तसेच साखर वसुलीचा ४० वर्षांचा विक्रम मोडला गेल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here