युपी: सेंद्रीय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

बुढाना : भैसाना साख कारखान्याच्यावतीने नैसर्गिक तथा सेंद्रीय शेतीविषयक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती पद्धतीविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जे. बी. तोमर यांनी शेतकऱ्यांना शेतीमध्ये जास्त रसायनांचा वापर करू नये असे आवाहन केले. चौगामाचे प्रमुख कृषीपाल राणा हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

अमर उजालामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या मेळाव्यात महाराष्ट्रातून आलेले कृषी विशेषज्ज्ञ सचिन चतुर आणि प्रशांत शिवगुडे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर करून शेती केल्यास होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष जे. बी. तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या काही भागात सेंद्रीय शेती करावी. त्यामुळे नैसर्गिक संतुलन टिकून राहण्यासह माती आणि मानवी आरोग्यात सुधारणा होईल. यावेळी शेतकरी ओमप्रकाश सतपाल, रामपाल, फुलसिंह, राजेंद्र सिंह, विक्रम व मिंटू आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here