उत्तर प्रदेश : सीमेवरील गावांतील २,५०० शेतकऱ्यांचा ऊस विक्रीसाठी संघर्ष

पिलिभित : जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेजवळील गावांपैकी बामनपूर भागीरथ, तातारगंज आणि बैलाहा येथील जवळपास २,५०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस विक्री करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. २०१८ पर्यंत, खिरी जिल्ह्यातील संपूर्णानगर साखर कारखान्याकडून त्यांचा ऊस खरेदी केला जात होता. आणि ऊस विकास विभागाकडून त्यांच्या पुरवठा कराराची प्रक्रिया केली जात होती. २०१९ मध्ये, वन अधिकाऱ्यांनी ती जमीन म्हणजे जंगलाचा हिस्सा असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्याची खरेदी रोखण्यात आली आहे.

या वर्षानंतर उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस नाईलाजास्तव नेपाळमधील खासगी गूळ युनिट्सना अतिशय कमी किमतीवर विक्री करावा लागत आहे. नेपाळमध्ये ऊसाचा दर प्रती क्विंटल ३५० रुपये आहे. भारतीय शीख संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जसवीर सिंग विर्क यांनी शुक्रवारी उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे प्रकरण सोडवले जाईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here