आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ७७ ट्रॅक्टर आणि मशिनरी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. होळीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची भेट मिळाल्याने होळीचा आनंद कितीतरी पटींनी वाढणार आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे की, २०१४ पूर्वी शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती? असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशामध्ये भविष्यात शेती करणारा खुश असेल. कोविड १९ दरम्यान, जेव्हा जगभरात साखरे उत्पादन आणि वितरण बंद पडले होते, तेव्हा भारताने साखरेचे उत्पादन जारी ठेवले होते, असे त्यांनी सांगितले.