उत्तर प्रदेश : उसाला ४५० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची भाकियूची मागणी

अमरोहा : सरकारने उसाचा भाव ४५० रुपये प्रति क्विंटल जाहीर करावा अशी मागणी भारतीय किसान युनियन टिकैत गटाने केली आहे. युनियनचे माजी राज्य उपाध्यक्ष आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तहसील कार्यालयात पोहोचले. यावेळी उप जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरकारने लवकरात लवकर ऊस दर वाढवावा अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांची भटक्या प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा ५,००० रुपये पेन्शन देण्यात यावी, तालुक्यामधील ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये चुकीच्या वाटांची दुरुस्ती करावी, जमिनीच्या नोंदींचे वितरण योग्य पद्धतीने करावे अशा मागण्या करण्यात आल्या. सरकारने शेतकऱ्यांच्या ट्यूबवेलवर जबरदस्तीने वीज मीटर बसवू नयेत आणि डिझेल, पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशी मागणीही करण्यात आली. या संदर्भात निवेदन देताना सत्यवीर सिंग, रामवीर सिंग, राधेश्याम, चंद्रपाल सिंग, धरम सिंग, प्रेम सिंग आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here