उत्तर प्रदेश : उसाच्या तुटवड्यामुळे काही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर संपण्याची शक्यता

अमरोहा : यंदा ऊस पिकावरील लाल सड रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. पिक उत्पादनावर वाईट परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल या काळात चालणारा ऊस गाळप हंगाम मार्चच्या मध्यात संपू शकतो. अमरोहा जिल्ह्यातील स्थिती पाहिली तर येथे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड केली जात आहे. शेतकरी जिल्ह्यातील सात आणि जवळच्या इतर जिल्ह्यांतील तीन साखर कारखान्यांना ऊस पुरवतात. यावेळी, ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

साखर कारखान्यांनी आतापर्यंत २९६.५० लाख क्विंटल ऊस गाळप केला आहे. परंतु लवकरच ऊस टंचाईचा धोका असल्याचे दिसत आहे. तथापि, अशी स्थिती शेतकऱ्यांसाठी वरदानही ठरू शकते. कमी उपलब्धतेमुळे त्यांना हंगामाच्या शेवटी उसाला चांगला भाव मिळू शकतो. कारखान्यांमध्ये अधिकाधिक ऊस खरेदी करण्यासाठी किंमत युद्ध सुरू राहिल अशी शक्यता आहे.

उसावर पडलेल्या किडीमुळे पिकाची पुरेशी वाढ झालेली नाही. विभागीय आकडेवारी पाहिल्यास, गेल्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी ४४८.१५ लाख क्विंटल ऊस खरेदी केला होता तर २८.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावेळी साखर उत्पादनासोबतच ऊस उत्पादनात २० टक्के घट होईल. जिल्हा ऊस अधिकारी मनोज कुमार यांच्या मते, लाल सड रोगामुळे २३८ या ऊस प्रजातीचे उत्पादन घटले आहे. उत्पादकताही खालावली आहे. सध्या सर्व साखर कारखान्यांना पुरेसा ऊस मिळत आहे. गाळप पूर्ण झाल्यानंतरच सर्व साखर कारखाने बंद केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here