उत्तर प्रदेश : थकीत ऊस बिलांबाबत राष्ट्रीय किसान शक्ति संघटना आक्रमक, १५ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा

लखीमपूर खेरी : राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेने शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. थकीत ऊस बिलांसाठी साखर कारखान्यांना १५ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. उसाची बिले न मिळाल्यास १५ जूनपासून सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. साखर कारखान्यांच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या बस्तीच्या रुधौली साखर कारखान्याचे युनिट हेड ओमपाल सिंग यांच्याकडे राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उसाच्या थकीत बिलांची मागणी केली.

राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजारी असलेल्या शेतकऱ्यांचे त्वरीत पैसे देण्याची मागणी केली. बजाज समुहाच्या बस्ती येथील रुधौली साखर कारखान्याचे युनिट हेड ओमपाल सिंग, गोला साखर कारखान्याचे युनिट हेड जितेंद्र सिंग जदौन, सरव्यवस्थापक (ऊस) पी. एस. चतुर्वेदी उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पटेल श्रीकृष्ण वर्मा आणि जिल्हाध्यक्ष मनोजकुमार फौजी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, उसाचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गोला, खांभारखेडा, पालिया कळण येथून खरेदी केलेल्या उसाचे केवळ एक महिन्याचे पैसे देण्यास साखर कारखान्याला यश आले आहे. उशिरा देण्यात येणाऱ्या ऊस बिलांवर १५ टक्के व्याज देण्यासा आदेश आहे. मात्र साखर कारखानदार ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बिले देत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here