उत्तराखंड : ऊस दरप्रश्नी काँग्रेस आक्रमक, सरकारचा केला निषेध

शांतीपुरी : उत्तराखंड सरकारने उसाच्या आधारभूत किमतीत वाढ न केल्याबद्दल संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी नेते डॉ. गणेश उपाध्याय आणि शेतकरी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र प्रसाद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. मंगळवारी, शांतीपुरी क्रमांक २ येथील पंचायत भवन परिसरात राज्य सरकारचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते डॉ. गणेश उपाध्याय यांनी उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात सरकारला अपयश आल्याची टीका केली. उपाध्याय म्हणाले की, सरकार फक्त दोन मिनिटांच्या विशेष अधिवेशनात पगार आणि भत्ते वाढवण्याचे ठराव मंजूर करते, परंतु उसाच्या किमतीत एक रुपयाचीही वाढ न करून सामान्य माणसाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे घोर दुर्लक्ष करीत आहे.

हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकरी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाच्या आधारभूत किमतीत वाढ न करणे अन्यायाकारक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीत आधीच कपात केली आहे. माजी जिल्हाध्यक्ष नारायण सिंह बिष्ट आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद कोरंगा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी चंद्रकला बिशन कोरंगा, नारायण सिंग कोरंगा, पान सिंग कोरंगा, गुड्डू पांडे, शेतकरी काँग्रेसचे जिल्हा सचिव महिपाल सिंग बोरा, ललित कोरंगा, विजय जोशी, नंदन सिंग बिष्ट इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here