डेहराडून : शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुढील दहा वर्षांसाठी विकासाचा रोडमॅप तयार करून योजना बनवा असे निर्देश उमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सचिवालयात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते म्हणाले की, ज्या जिल्ह्यांत कृषी तथा उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित असतील, त्या जिल्ह्यांच्या मुख्य विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. सिंचन तसेच लघू सिंचन विभागाने कृषी आणि उद्यान विभागाच्या समन्वयाने काम करावे.
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, सर्व विभागांना पुढील दहा वर्षांसाठी रोडमॅप तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि डोंगराळ विभागातील लोकांच्या उपजिविकेसाठी बागायतीवर अधिक भर देण्याची गरज आहे. ते म्हणाले की, पाच वर्षात राज्याचा जीडीपी दुप्पट करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने काम करण्याची गरज आहे.