लिब्बरहेडी साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा, ऊस बिले अदा

रुडकी : लिब्बरहेडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. साखर कारखान्याने वीस जानेवारीपर्यंत पुरविण्यात आलेल्या उसापोटी शेतकऱ्यांना बिले अदा केली आहेत. पुढील आठावड्यापर्यंत शेतकऱ्यांना आणखी पैसे दिले जातील असे त्यांनी सांगितले.

सध्या साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडील ऊस जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. अशाच साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊस पाठविण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. ऊस गुऱ्हाळाला देण्याऐवजी त्यांनी साखर कारखान्याला पाठवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

लिब्बरहेडी साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २० जानेवारीपर्यंत पुरवठा केलेल्या उसाचे पैसे दिले आहेत. विविध ऊस समित्यांना १७ कोटी ६० लाख रुपये पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळतील. कसेच आणखी १० दिवसांचे पैसे देण्याची तयारी कारखाना करीत आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला स्वच्छ, ताजा ऊस पाठवावा. उसाची तोडणी पावती मिळाल्यानंतरच ऊस तोडणीस सुरुवात करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here